
हॉटेल मराठ मावळ चा प्रवास
नमस्कार मी, संग्राम माया मच्छिद्रनाथ जगताप माझं शिक्षण डिप्लोमा इन फार्मसी, मी गेले १४ वर्ष मेडिकल चा व्यवसाय यशस्वीरित्या म्हणजे, आमच्या भोर तालुक्यात टॉप ३ मधील मेडिकल म्हणून नाव कमावले होते. परंतु मनात काहीतरी वेगळं करण्याचं, म्हणजे आपण काहीतरी तयार केलेलं, आपण स्वःता काहीतरी बनवलेलं, स्वःता काहीतरी क्रीएट केलेलं, असं काहीतरी करावं आणि ते लोकांना आवडावं व त्याच रूपांतर मोट्या उद्योगामदे व्हावं. हे वाटायचं कारण असं होते कि, मेडिकल मदे तेच-तेच रोजच चिट्टी आली कि ते औषध काडून दे, तेच – तेच होते त्यात काही वेगळे पण नव्हता व वेगळे काही करण्याचा स्कोप पण नव्हता, बोर झालो होतो, मज्जा येत नव्हती.
त्यात वेगळं काय करता येईल त्याच विचार करताना, आपल्या आवडीचं काय ह्याचा विचार केला तर मी मटणाची भाजी चांगली बनवतो, व घरात काही वेगळा पदार्थ बनवल्यावर पहिल्यांदा मला टेस्ट करायला देत. कारण माझा टेस्ट सेन्स चांगला आहे. घराबाहेर आलेल्या वासावरून घरात कोणती भाजी किंवा कालवण बनवलं आहे हे अजूनही न बघता सांगतो. ह्याच चांगले नॉलेज असल्यामुळे हा व्यवसाय चालू केला, खूप वेग वेगळ्या रेसिपी आपण बनवू शकतो व एक वेगळेपण आणू शकतो वाटू लागले आणि हॉटेल व्यवसायात वाटचाल करायचं ठरवले. हॉटेल व्यवसायाला जग बुडे पर्यंत मरण नाही. आपण आपल्या कॉलीटी च्या जोरावर हा व्यवसाय जवळपास च्या शहर मध्ये वाढवू शकतो, परिणामी मराठी उद्योजक निर्माण होतील, त्यांना एक चांगली ओळख निर्माण होईल, तसेच मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध होईल व ज्यात आपली आवड आहे तोच व्यवसाय करता येणार ह्याच वेगळाच समाधान….!
मेडिकल चा व हॉटेलचा यशस्वी व्यवसाय प्रेरणा होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची श्रीमंत योगी , राजा शिवछत्रपती, छावा अशी अनेक पुस्तकामुळे जीवन जगण्याची विचारसरणीच बदलून गेली. जस छत्रपतींनी स्वराज्यासाठी आयुष्य वाहील तसच आपणही एक मावळा होऊन फुल ना फुलाची पाकळी म्हणून छत्रपतींच्या त्यागापायी, ते अजूनही पाहत असतील तेथून त्यांना आपल्या मराठी मावळ्यांनावर आभिमान वाढेल , असं काहीतरी करून दाखवावं. हे वेळ हातात तलवार घेऊन लढाई करण्याची नाही तर मराठी पोरांना प्रत्येक क्षेत्रात घोडदौधं करून पुढे जाण हेच माझ्यामते, छत्रपतींना खरी श्रद्धांजली ठरेल .
माझं व्हिजन आहे कि पुणे शहरात नव्हे तर संपूर्ण जिल्यामधें, नॉन-व्हेज मध्ये त्यातही, त्यातही मटण -भाकरी साठी टॉप ३ मदे आपल्या हॉटेल च नाव घेतले गेले पाहिजेल. हा मानस आहे व मी तो तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण करेलच याची मला खात्री आहे.
धन्यवाद .
Mission
“आमच्या पाहुण्यांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, जिथे प्रत्येक क्षण हा वैयक्तिक तत्त्वावर तयार केलेला असतो. उत्कृष्ट आतिथ्यसेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, आणि अत्यंत व्यावसायिक आणि सुसंस्कृत कर्मचारी यांची एकत्रित मेजवानी देत आम्ही पाहुण्यांचे जीवन समृद्ध करण्यास सतत कार्यरत आहोत. आम्ही आमच्या समुदायाशी सखोल नाते निर्माण करतो, स्थानिक सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचा आदर करतो, आणि त्या जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो.आम्ही आपल्या पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी, शाश्वत संसाधनांचा वापर करण्यासाठी, आणि सामाजिक जबाबदारीचे पालन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. प्रत्येक पाहुण्याला सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या प्रवासातील सर्वोत्तम आठवणी दिल्या जातील यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहतो.”
Vision
“आमचे हॉटेल हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आणि आदर्श ठिकाण बनावे, जिथे लक्झरी, आराम आणि अतुलनीय सेवा यांचा अद्वितीय मिलाफ आढळतो. आम्ही केवळ पाहुण्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत नाही तर त्यांच्या अपेक्षांपेक्षा जास्त अनुभव देण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण सेवा आणि सुविधा प्रदान करत राहतो. आमचे ध्येय म्हणजे एक अशी जागा निर्माण करणे, जिथे प्रत्येक पाहुण्याला त्याच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव दिला जातो. यासोबतच, आम्ही शाश्वत विकासाच्या तत्वांवर आधारित कार्य करत, पर्यावरण रक्षणासाठी ठोस उपाययोजना करतो, ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक हरित आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन मिळते.”